अहमदनगर | Ahmednagar
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ (Union budget) सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. आता या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया येत आहेत.
‘केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतल्याबद्दल भारतीय किसान सभेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, काही अपेक्षाही ठेवण्यात आल्या आहेत,’ अशी प्रतिक्रिया किसानसभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.