अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्हयात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्हयात आतापर्यंत पंधरा हजाराहून अधिक रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. आज हॉस्पिटल मधून तब्बल
६२१ रुग्णांना डिस्चार्ज डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आजपर्यंत १५ हजार ६३६ रूग्ण करोणा मुक्त झाले आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४५, संगमनेर १५, राहाता ३५, पाथर्डी २५, नगर ग्रा. ७९, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा २९, श्रीगोंदा २६, पारनेर २३, अकोले १५, राहुरी २०, शेवगाव १४, कोपरगाव २२, जामखेड २६, कर्जत ६ व इतर जिल्हा १ रुग्णाचा समावेश आहे.