जिल्हयातील एकूण रूग्ण संख्येने १६ हजाराचा टप्पा ओलांडला

जिल्हयात आजपर्यंत २१९ रुग्णाचा दुर्देवी मृत्यू
जिल्हयातील एकूण रूग्ण संख्येने १६ हजाराचा टप्पा ओलांडला

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७३० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६९, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०२, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर ०६, राहुरी ०३, कोपरगाव ०६, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४४५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १८४, संगमनेर ३७, राहाता १७, पाथर्डी १७, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा २४, श्रीगोंदा ११, पारनेर २०, अकोले १६, राहुरी ०७, शेवगाव २१, कोपरगाव २४, जामखेड १३, कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आजपर्यंत २१९ रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com