<p><strong>अकोले (प्रतिनिधी) - </strong></p><p>शेतकर्यांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडु नयेत तसेच लाकडाऊन काळातील वीजबील माफ करावे या मागणीसाठी </p>.<p>वीजवितरण कंपनी आणि सरकारच्या विरुद्ध आज महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अकोलेतही विविध सामाजिक संघनटनांच्या जोडीने आंदोलन करण्यात आले.</p><p>अकोले वीज वितरण कार्यालयास घेराव घालुन वीजवितरण कार्यालयातील वीज बंद करुन वीजवितरण कार्यालयातील आधिकार्र्यांना कोंडुन आंदोलन करण्यात आले. मागण्यांच्या विविध घोषणांनी परीसर दुमदुमला होता. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेबरोबरच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात महाराष्ट्र नवनिर्मान सेना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शेतकरी आणि वीजग्राहकांनी सहभाग घेतला. जवळ-जवळ दोन तास हे आंदोलन चालु होते. प्रमुख कार्यकर्त्यांनी आप-आपल्या भुमिका मांडल्या.</p><p>युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश नवले, सुशांत आरोटे, सुनिल पुंडे सुरेश नवले, शुभम आंबरे, दिलीप शेणकर, सोमनाथ नवले, सुधाकर आरोटे, डॉ. सचिन गुंजाळ, वैभव सावंत, देवा बंगाळ, एकनाथ गजे, सुनिल मोरे, अनिल वाकचौरे, राजेंद्र गजे, मच्छींद्र पानसरे, संतोष घोडके, योगेश राक्षे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी घेतला. मुख्य अभियंता ज्ञानेश्वर बागुल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.</p><p>मुख्य अभियंता नाशिक विभाग यांचेबरोबर फोनवर यावेळी आंदोलक शेतकर्यांनी चर्चा करुन शेतकर्यांच्या रोहित्रांचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुर्ववत जोडुन देऊन शेतकर्यांना मुदत देऊन वीजबील वसुल करावेत व लाकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे या व इतर विषयावर सविस्तर चर्चा करुन शेतकर्यांचे प्रश्न समजुन घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.</p>