गुरूजीच्या बदल्याची प्रक्रिया सुरू

25 मार्चपर्यंत बदली पात्र शिक्षकांची माहिती अपडेट करण्याच्या सुचना
गुरूजीच्या बदल्याची प्रक्रिया सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती येत्या 25 मार्चपर्यंत अपडेट करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी दिली आहे.

राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मागील आठवड्यात गुरूवार (दि.17) रोजी व्हीसी झाली. या व्हीसीला सचिव कुमार, उपसचिव प्रवीण जैन, के.जी. वळवी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक हे उपस्थित होते. यात 12 विषयांवर चर्चा करण्यात आली असून शिक्षकांच्या बदल्यासाठी यू डायस नूसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्यावत करणे, शिक्षकांचे रोष्टर अद्यावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानिकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानूसार शिक्षकांच्या नेमणूका करणे आदी विषयाचा समावेश होता.

यात शिक्षकांच्या बदल्यासाठी त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी 25 मार्चची डेड लाईन देण्यात आलेली आहे. यासाठी शिक्षकांची माहिती काळजीपूर्व दुरूस्त करून अचूकपणे भरावी, सर्व माहिती इंग्रजीत असावी, शिक्षकांची बदलेल्या माहितीचा रंग पिवळा असावा, बदलून आलेल्या शिक्षकांच्या नावाचा रंग लाल असावा, शिक्षकांच्या जन्म तारीख काळजी भरावी, बारा अंकी आधार नंबर अचूक असावा, पॅन नंबरची माहिती घ्यावी, शालार्थ आयडीत कोणताही बदल करून नयेत, यासह अन्य महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहे.

दरवर्षी साधारणपणे 31 मेच्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र, दोन वर्षापासून कोविडच्या संसर्गामुळे नगरसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या होणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील तयारी सुरू झाली आहे. शिक्षकांसाठी बदल्या ही मोठी बाब असून बदलीत शिक्षकांची गैरदूर होते. शिक्षकांच्या बदलीत चार प्रकार असून संवर्ग एक आणि दोन पत्नी-पत्नी एकत्रिकरण आणि सेवाज्येष्ठतेने शिक्षकांना बदली करता येते. दोन वर्षापासून बदली होत नसल्याने शिक्षकांना मोठ्या गैरसोयीला समोरे जावे लागत होते.

यंदा शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. यासाठी मागील आठवड्यात ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी व्हीसी घेवून सुचना दिल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या सुचनानूसार उद्या सोमवारपासून माहिती संकलित करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या पुढे येणार्‍या आदेशानूसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

- भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com