<p><strong>श्रीरामपूर (प्रतिनिधी) -</strong> </p><p>करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार भरविण्यास बंदी घातलेली असतानाही </p>.<p>काल श्रीरामपूरचा शुक्रवारचा आठवडे बाजार सकाळी भरण्यास सुरुवात झाली होती. नगरपालिकेच्या काही कर्मचार्यांनी या आठवडे बाजारातील व्यावसायिकांकडून दैनंदिन पावतीही फाडली.</p><p> नंतर अधिकार्यांना जिल्हाधिकार्यांचा आदेश आठवला आणि पुन्हा बाजार बंदसाठी हे अधिकारी व कर्मचारी पुढे सररसावले. नगरपरिषदेकडून आठवडे बाजाराचे नियोजन नसल्यामुळे बाजाराचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला आहे.</p><p>श्रीरामपूर नगरपालिकेच्या सत्ताधार्यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे आठवडे बाजार भरवून परत उठवल्यामुळे शेतकरी, व्यापारी यांना आर्थिक फटका बसला आहे. या सगळ्या प्रकाराचा निषेध करत असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. </p><p>जर अगोदरच वर्तमानपत्र व इतर माध्यमातून बाजार बंद असल्याचे जाहीर केले असते तर शेतकरी व व्यापारी यांचा आज आणलेला भाजीपाला वाया गेला नसता. वाहतुकीच्या खर्चाचा नाहक भुर्दंड बसला व रोजंदारीही बुडाली नसती. श्रीरामपूर नगरपालिकेच्या या अनागोंदी कारभारावर शेतकरी व व्यापारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जर आठवडे बाजाराबर बंदी होती,तर नगरपालिकेने पावत्या कशाच्या फाडल्या, असा सवालही त्यांनी केला.</p>