श्रीगोंदा कारखान्याने मागील एफआरपी द्यावी

साखर कारखाना
साखर कारखाना

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची शिल्लक राहिलेली एफआरपी रक्कम ऊस देणार्‍या शेतकर्‍यांना देण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे आणि भाऊसाहेब पवार यांनी केली आहे.

साखर आयुक्त यांच्या अहवालानुसार मागील हंगामातील अंतिम एफआरपी 2 हजार 661.20 रूपये प्रती टन इतकी होत आहे. कारखान्याने त्यापैकी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 2 हजार 444.40 रूपये प्रती टन इतकी रक्कम जमा केली आहे. आता मागील हंगामात सभासदांचे राहिलेले एफआरपी रक्कमचे पैसे नागवडे कारखान्याने का दिले नाहीत? अशी विचारणा संदीप नागवडे व भाऊसाहेब पवार यांनी यासाठी कार्यकारी संचालक यांना नवेदन देऊन केली आहे. याबाबत 7 दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे.

यावेळी निदेवन देताना अनंता पवार, राजेंद्र निळकंठ नागवडे , प्रविण नागवडे, संतोष जठार , संतोष जौधाळ,अक्षय फाजगे उपस्थित होते.

प्रसंगी न्यायालयात जाणार शासनाच्या नियमानुसार कारखान्यांना एफआरपी रक्कम ही ऊस गेल्यानंतर एका महिन्याच्या आत द्यावी लागते. परंतु नागवडे कारखान्याने दुसरा हंगाम संपला तरी ती दिलेली नाही. आता कारखान्यास एफआरपी रक्कम आणि त्याचे व्याज सुद्धा सभासदांना द्यावे लागणार आहे,वेळ पडल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचे यावेळी भाऊसाहेब पवार यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com