'ती' घटना अत्यंत दुर्दैवी - नामदार थोरात

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना संकटात प्रशासन व पोलिस यंत्रणा ही नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहे. त्यांचे कार्य व कर्तव्य करत असताना या त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणे हे अत्यंत चूक आहे. कालची पोलिसांबाबत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

संगमनेर मधील या घटनेबाबत बोलताना नामदार थोरात म्हणाले की, मागील दीड वर्षापासून जे लोक नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहे. प्रशासन व पोलिस यंत्रणांमधील कर्मचारी हे फ्रन्टलाइन वर्कर आहेत.

ते त्यांचे कर्तव्य व काम करत असताना त्यांच्या बाबत अशी घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचा आपण स्पष्ट असून प्रशासन व पोलिस त्या पद्धतीने काम करतील असे ही नामदार थोरात यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com