श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
श्रीरामपूर शहर व परिसरात काल गुरूवारी दुसर्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे श्रीरामपूरकरांची धांदल उडाली.
बुधवारी रात्री 8.15 वाजता पावसास सुरूवात झाली होती. ही रिपरिप सुमारे 15 मिनीटे सुरू होती. त्यानंतर गुरूवारीही रात्री 8 वाजता पावसास सुरूवात झाली. सुमारे अर्धातास पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे आंबा पिकाच्या मोहराला फटका बसणार आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे किड व अळीचा प्राद्रुुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत रिपरिप पाऊस सुरु होता.