राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri
राहुरी नगरपालिकेच्यावतीने मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 वाजता स्वच्छ भारत व माझी वसुंधरा अभियांन अंतर्गत
शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी सायकल रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमध्ये नगरपालिकेच्या नगरसेवकांसह अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था सहभागी होणार असून त्यात शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे व नगराध्यक्षा सौ. अनिता पोपळघट यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत माझी वसुंधरा हा उपक्रम राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा हे अभियान सुरू करण्यात आले असून त्यात वृक्षारोपण त्याचे संगोपन करणे, शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यातील एक भाग म्हणून येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राहुरी नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातून सायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅली राहुरी नगरपालिका कार्यालयापासून सुरू होऊन स्टेशनरोड नाका नंबर 5 वरून पाण्याची टाकीवरून नगर मनमाड राज्यमार्ग येथून नवी पेठ परत नगरपालिका कार्यालय अशी राहणार आहे.
या रॅलीत नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ. सौ उषाताई तनपुरे, नगराध्यक्षा सौ. अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी केले आहे.