<p><strong>आश्वी |वार्ताहर| Ashwi</strong></p><p>संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे रविवारी लागलेल्या आगीमध्ये येथील पाच शेतकर्यांचा तब्बल 8 एकर ऊस जळाल्याने अंदाजे 8 ते 9 लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.</p>.<p>याबाबत सरपंच पुंजाहरी शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास मनोली - ओझर रस्त्यालगत असलेल्या गट नंबर 39 मधील दौलत मंगु बनवाले यांचा 1 हेक्टर, बाबासाहेब मंगु बनवाले यांचा 1 हेक्टर, गट नंबर 41 मधील राजेंद्र बाळासाहेब शिंदे यांचा 24 गुंठे, संजय बाळासाहेब शिंदे यांचा 24 गुंठे तसेच प्रभाकर बाबुराव पराड यांचा 2 एकर ऊस विजेच्या खांबावर शॉटसर्कीट झाल्याने जळाला आहे.</p><p>उसाला आग लागल्याची माहिती मिळताच संगमनेर कारखान्याचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रसंगी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांच्या व तरुणांच्या मदतीने आग विझवण्यात आली असली तरी येथिल पाच शेतकर्याचे तब्बल 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.</p><p>दरम्यान महावितरणच्या वीज वाहक तारामुळे झालेल्या शॉटसर्कीटमुळेचं या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे असल्याने या नुकसानग्रस्त शेतकर्यांना महावितरणने अर्थिक भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे. </p><p>यावेळी सरपंच पुंजाहरी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिंदे, पुंजाजी शिंदे, शांताराम पांडे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, संजय दिवे आदींसह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.</p>