नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी या खेडेगावातील सुलोचनाबाई इंडस्ट्रीज् या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाने करोना काळात सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. सध्या ऑक्सीजन टंचाई असल्याने या प्रकल्पातून दिवस-रात्र ऑक्सीजन सिलिंडर भरण्याचे काम सुरू आहे. मात्र तीन वर्षापूर्वी बजरंग पुरी यांनी सुलोचनाबाई इंडस्ट्रीज्ची स्थापना केली, तेव्हा त्यांना एक दिवस त्यांचा हा प्रकल्प अनेकांच्या जीवनाला ऑक्सीजन पुरविण्यासाठी कारणीभूत ठरेल, असे वाटले नव्हते. बजरंग पुरी, आशिष पुरी व मंगेश पुरी या संचालकांसह चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत यांच्याशी सार्वमतचे तालुका प्रतिनिधी सुखदेव फुलारी यांची केलेल्या गप्पा...