निंबळकच्या ग्रामस्थांनी केली मंत्री तटकरेंकडे 'ही' मागणी

निंबळकच्या ग्रामस्थांनी केली मंत्री तटकरेंकडे 'ही' मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निंबळक (ता. नगर) गावाची लोकसंख्या विचारात घेता गावाचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. गावाला एमआयडीसी कडून होणार्‍या

दररोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ होण्याच्या मागणीसाठी गावाच्या शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांच्यासह उद्योग मंत्री ना. अदिती तटकरे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन, गावाच्या पाणी प्रश्नावर चर्चा केली.

उद्योग मंत्री तटकरे यांनी गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात निंबळक सरपंच, उपसरपंच सदस्यांसह एमआयडीसीचे अधिकारी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. यावेळी अजय लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिंदे, भाऊ शिंदे, सोमनाथ गायकवाड, भाऊराव गायकवाड, घनश्याम म्हस्के, समीर पटेल, रावसाहेब कोतकर आदी उपस्थित होते.

निंबळक गावाला एमआयडीसी कडून दररोज साडेपाच लाख लीटरचा पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा सन 2001 च्या जनगणनेनुसार असणार्‍या लोकसंख्येचा विचार करून केला जातो. परंतु ग्रामपंचायतीचे 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 8 हजार 300 इतकी आहे.

आज रोजीची लोकसंख्या अंदाजे 15 हजार पेक्षा जास्त आहे. तसेच एमआयडीसी क्षेत्र जवळ असल्याने तरंगती लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे गावाला पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com