अकोले |प्रतिनिधी| Akole
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी उन्हाळी हंगामातील शेतीचे दुसरे आवर्तन उद्या बुधवारी सकाळी 10 वा निळवंडे धरणातून 1 हजार 450 क्युसेक्स विसर्गाने सोडण्यात येणार आहे. अशी माहिती जलसंपदा चे सहाय्यक कार्यकारी अभियंता गणेश हारदे यांनी "सार्वमत "शी बोलताना दिली.
काल दि. 27 एप्रिल अखेर भंडारदरा धरणात 6 हजार 257 दलघफू तर निळवंडे धरणात 3 हजार 870 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता .
हे आवर्तन साधारणत २० ते २५ दिवस सुरू राहील. या आवर्तनात अंदाजे ३००० ते ३२०० दलघफू पाणी वापर होईल असा अंदाज असल्याचे भंडारदऱ्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले.