
अकोले |प्रतिनिधी| Akole
निळवंडे धरणातून (Nilwande Dam) आज रविवारी सायं.6 वाजता 600 क्यूसेकने शेती (Farm) व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन (Drinking Water Rotation) सोडण्यात आले असल्याची माहीती भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
हे आवर्तन (Rotation) साधारणतः 20 ते 25 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून (Nilwande Dam) उन्हाळी हंगाम सिंचन व बिगर सिंचन आवर्तन क्र.२ आज रविवारी सायं.6 वाजता 600 क्यूसेक विसर्गाने सुरू करण्यात आले आहे.
आवर्तन सोडतेवेळी 11 हजार 39 दलघफु क्षमतेच्या भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) 6 हजार 579 दलघफू व 8 हजार 320 क्षमतेच्या निळवंडे धरणात 4 हजार 757 दलघफू पाणी शिल्लक होते. भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) 59:60 टक्के तर निळवंडे धरणात (Nilwande Dam) 57:12 टक्के पाणी शिल्लक आहे.