अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १६०६ इतकी आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११५, अकोले ३३,जामखेड २३, कर्जत २१, कोपरगाव २१, नगर ग्रा ३६, नेवासा २६, पारनेर ३३, पाथर्डी ३६, राहाता ३२, राहुरी १५, संगमनेर ५२, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल १०, इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.