अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्ह्यात आज ४१५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ७९७ इतकी झाली आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४९, अकोले २२, जामखेड ६६, कर्जत ३७, कोपरगाव १४, नगर ग्रा. १३, नेवासा ०७, पारनेर १०, पाथर्डी ४७, राहाता ०४, राहुरी ०६, संगमनेर २२, शेवगाव ३३, श्रीगोंदा ५६, श्रीरामपूर २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.