राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
दक्षिण नगर जिल्ह्याला (South Nagar district) जलसंजीवनी देणार्या २६ हजार दलघफूट पाणीसाठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा (Mula Dam) पाणीसाठा बुधवार (दि.२८) सकाळी सहा वाजता १३,८६५ दशलक्ष घनफूट (५३.३२ टक्के) झाला आहे.
लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून ५,०१६ क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. मात्र धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी खरिपाची पिके सुकून चालली आहेत.
विशेष म्हणजे धरणाच्या गेल्या २२ वर्षांच्या इतिहासात (history of 22 years) केवळ जुलै महिन्यातच हे धरण निम्मे भरण्याची ही बारावी वेळ आहे. तर ऑगस्टमध्ये तब्बल नऊवेळा धरण निम्मे भरलेले आहे.