<p><strong>अहमदनगर -</strong> </p><p>एमपीएससी ची तयारी करणार्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील वैभव शितोळे या विद्यार्थ्याचं पुण्यात करोनाने निधन झाले </p>.<p>आहे. वैभव 2014 साली पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. </p><p>आंदोलनानंतर तीन दिवसांनी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे त्याला परीक्षा देखील देता आली नव्हती. रुग्णालयात त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. </p><p>परंतु शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.नाशिक येथे इंजिनिअरींग चे शिक्षण पूर्ण केलेल्या वैभवला एक बहीण आहे, तिचं नुकताच लग्न झालं. तर आई-वडिल शेती करतात. आई-वडिलांसाठी तो एकुलता एक होता. वैभवला पोलीस सेवेत जायचं होतं. डीवायएसपी होण्याचे त्याचे स्वप्न होते.</p>