<p><strong>संगमनेर |प्रतिनिधी| sangmner</strong></p><p>अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून </p>.<p>काँग्रेसचा विचार समजून सांगत लोककल्याणाची कामे प्राधान्याने करीत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी, असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.</p><p>सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित उत्तर विभागाच्या तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. </p><p>अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. समवेत आमदार लहू कानडे, इंद्रजित थोरात, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. एकनाथ गोंदकर, सौ. लताताई डांगे, संभाजी माळवदे, राहाता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, सेवादलाचे अध्यक्ष सुरेश झावरे, सुभाष सांगळे, विश्वासराव मुर्तडक, अरुण पाटील, तुषार पोटे, दादापाटील वाकचौरे, किशोर भणगे, कार्लेस साठे, राजेंद्र वाघमारे, नितीन शिंदे, संजय छल्लारे, अंकुश कानडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी तालुकानिहाय विविध सेलचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला.</p><p>आ. डॉ. तांबे म्हणाले, तरुणांना काँग्रेस पक्षात मोठी संधी असून आता प्रत्येकाने हा विचार खेडोपाडी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करावे. शेतकरी व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर मोठे आंदोलन उभे आहे. राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला झळाळी मिळाली असून हा पक्ष अधिक सक्षमतेने काम करीत आहे.</p><p>आ.कानडे म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. कार्यकर्त्यांनी पदाची अपेक्षा न करता अधिकाधिक संघटनात्मक काम करताना विकासाची कामे करावी.</p><p>जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात गाव तेथे शाखा सुरू करताना जिल्ह्यामध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे.</p><p>यावेळी कैलास वाकचौरे, अॅड.समीन बागवान, अमृत गायखे, राजेंद्र निर्मळ, बाळासाहेब चव्हाण, गणपतराव सांगळे, इंद्रभान थोरात, राजेंद्र वाघमारे, शोभा निगुर्डे, सुनील साळुंखे, शितल देशमुख, मिनानाथ पांडे, आसिफ तांबोळी, सौ.निर्मलाताई गुंजाळ, आनंद वर्पे, सोमेश्वर दिवटे, कचरु पवार, सौ.प्रमिलाताई अभंग, सौदामिनी कान्हौरे, भास्कर शरमाळे, निखिल पापडेजा आदींसह 6 तालुक्यांतील विविध पदाधिकारी उपस्थित होते.</p>.<div><blockquote>‘त्यांना’ काँग्रेस पक्षाने मोठे केले. या पक्षाच्या माध्यमातून मंत्रिमंडळात पदे भूषविली. ते आता काँग्रेसबद्दल बोलत आहेत, हे हास्यास्पद आहे. आता तुम्ही काँग्रेसची काळजी करु नका. नवी पिढी सक्षम आहे. आता तुमची आहे त्या पक्षात काय अवस्था आहे? याचे चिंतन करा. असा टोला राहाता काँग्रेसचे नेते सुरेश थोरात यांनी नामोल्लेख टाळून लगावला.</blockquote><span class="attribution"></span></div>