<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार तीन महिन्यात कोसळेल, असे वक्त्व्य करतात. </p>.<p>परंतु 14 महिने झाले तरी सरकार कोसळू शकले नाही. आमचे सरकार शेतकरी हिताचे, विकासाचे आणि विचारांचे आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.</p><p>आमदार रोहित पवार हे नगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. पवार म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात, अशी टीकाही आमदार पवार यांनी केली. </p><p>भाजप नेते अमित शहा यांनी शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती असे वक्तव्य केले. यावर पवार यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेवटच्या काळात भाजपने विश्वासघात केला असे वाटले असावे. यामुळे त्यांनी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी केली. नवे समिकरण तयार झाले. संपूर्ण देशभरातील घटक पक्षांचाही आवाज वाढला. हे भाजपला रूचले नाही. त्यामुळे हे अमित शहा यांचे व्यक्तीगत मत असावे, असेही पवार म्हणाले.</p>