<p><strong>कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav</strong></p><p>समृद्धी महामार्गालगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन जाणार आहे. शासनाकडून कोपरगाव तालुक्यात </p>.<p>बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणार्या शेतकर्यांच्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी शेतकर्यांना दिली.</p><p>समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन जाणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात येणार असून या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकर्यांनी आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतली होती. </p><p>त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात शेतकरी व बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार्या टुला कंपनीच्या अधिकार्यांची व सदर प्रकल्पात जमीन जाणार्या शेतकर्यांची बैठक घेतली.</p><p>यावेळी आ. काळे यांनी प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन कोपरगाव तालुक्यातून ज्या शेतकर्यांच्या जमिनीतून जाणार आहे त्या शेतकर्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. सदरची बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने जाणार आहे.</p><p>बुलेट ट्रेनच्या ट्रॅकसाठी (रेल्वे लाईनसाठी) समृद्धी महामार्गालगत 17.5 मिटर जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. यामध्ये जवळपास 1200 शेतकर्यांच्या जमिनी जाणार आहेत. यापूर्वीही समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या त्या शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून दिला आहे. </p><p>त्याप्रमाणेच बुलेट ट्रेनसाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार आहेत त्या शेतकर्यांना देखील जास्तीत जास्त मोबदला मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना दिले.</p><p>यावेळी टुला सर्वेक्षण कंपनीचे जाधव, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, बाळासाहेब रोहमारे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सीनगर, दिलीपराव बोरनारे, दिलीप शिंदे, देवेन रोहमारे, सुधाकर होन, सुनील होन, शंकर गुरसळ, बंकटराव जगताप, कृष्णा शिलेदार, राजेंद्र निकम, भास्कर होन आदींसह शेतकरी उपस्थित होते.</p>