<p><strong>कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav</strong></p><p>महाविकास सरकार आल्यापासून शेतकर्यांना न्याय मिळत आहे. मागील सरकारच्या काळात सुस्त असलेल्या </p>.<p>विमा कंपन्यांना सरकारने कडक शब्दांत समज दिल्यामुळे या कंपन्या सुतासारख्या सरळ झाल्या असून या कंपन्यांनी हवामान आधारित फळपीक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर 10 लाख 55 हजार 518 रुपये जमा केले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.</p><p>मागील सरकारच्या काळात थकीत असलेली शेतकर्यांची देणी मिळावी यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्यामुळे आजपर्यंत कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांना ठिबक सिंचनचे एक कोटी चोवीस लाख रुपयांचे अनुदान महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात येऊन अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. </p><p>मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे 19.67 कोटी रुपयांची मदत मतदार संघातील शेतकर्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची रक्कम शेतकर्यांना मिळाली आहे. </p><p>शेतकर्यांची उर्वरित देणीही तातडीने मिळावी यासाठी पाठ्पुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकार आल्यापासून पंतप्रधान पीक विमा योजना असेल किंवा हवामान आधारित फळपीक विमा असेल या कंपन्यांना शासनाने शेतकर्यांची देणी तातडीने द्या अशी तंबी दिली होती. </p><p>त्यामुळे शेतकर्यांची थकीत देणी देण्यावाचून या कंपन्यांना गत्यंतर राहिलेले नाही. डाळिंब उत्पादक शेतकर्यांना देखील तातडीने हवामान आधारित फळपीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना सूचना देण्यात आल्या असून डाळिंब उत्पादक शेतकर्यांना देखील लवकरच विम्याची रक्कम मिळणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.</p>