<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांसाठी 50 ऐवजी 200 लोकांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळावी, अशी मगाणी </p>.<p>नगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.</p><p>याप्रसंगी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रक़ांत फुलारी, अजिंक्य पवार, राजेंद्र उदागे, जालिंदर कोतकर, जयंत जाधव, संजय जाधव, अभिमन्यू नय्यर, अमित मुथा, प्रमोद लगड, रमाकांत गाडे आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून करोना प्रादुर्भावामुळे व्यवसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत. </p><p>2020-21 या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्ज, आदी खर्चाने मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोव्हिडचे संकट दुर होत असतांना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय-हॉल चालक यांच्यावर शासनाचे नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. </p><p>यात मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व सदस्य शासनाचे सर्व नियम पालन करुन 50 ऐवजी 200 लोकांना कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कोणत्याही धार्मिक, लग्न, कौटुंबिक कार्याक्रमासाठी घरातीलच 100 लोक असतात, जवळचे नातेवाईक त्याचबरोबर सजावटकार, आचारी, केटरर्स, फोटोग्राफर, बॅण्ड-स्पिकर, भटजी आदींचा विचार केल्यास ही संख्या किमान 200 पर्यंत जाते. </p><p>यावेळी जिल्हा हॉटेल, परमिट रुम असोसिएशनच्यावतीनेही जिल्हाध्यक्ष हेमंत जाधव यांनीही नियमात शिथिलता देण्यात यावी याबाबतचे निवेदन दिले. याप्रसंगी सचिव डॉ. अविनाश मोरे, अनिल बोराटे, प्रशांत बोरुडे, अनिल ससाणे, अर्जुन बोरुडे आदी उपस्थित होते.</p>