<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी अमृत पाणी योजनेची मुळा धरण ते विळद पंपींग स्टेशन पर्यंतची पाहणी करून माहिती घेतली असता</p>.<p>ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजनेचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे या योजनेच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे नगर शहरामध्ये ठिकठिकाणी पाण्याची अडचण निर्माण होत आहे. यासाठी ठेकेदार, पाणीपुरवठा विभागाची बैठक तातडीने घेऊन या योजनेला गती देऊन मार्चअखेर पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी यावेळी दिले.</p><p>स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी अमृत पाणी योजनेची बैठक घेतली. यावेळी पाणीपुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, सोनन इंजिनिअरींगचे संचालक पानसे, अभियंता गणेश गाडळकर, पीएमसीचे मुळे आदी उपस्थित होते. यावेळी दुसर्यांदा शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना धनादेश द्यावा व त्यांच्या शेतातून लवकरात लवकर पाईप टाकण्याचे काम सुरू करावे. </p><p>तसेच वनविभागाच्या जागेतून पाईपलाईन जात आहे. जिल्हा वनाधिकारी रेड्डी यांची भेट घेऊन परवानगी घ्यावी तसेच नदी व ओढ्यांवरील पाईपलाईनसाठीचे पूल तयार करावेत. मुळा धरण येथील पंपींग स्टेशनचे काम मार्गी लावावे यासाठी प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरूवात करावी.</p>