राज्यातील साखर कारखान्यांकडून 36 हजार 380 कोटी रुपयांची एफआरपी अदा

राज्यातील साखर कारखान्यांकडून 36 हजार 380 कोटी रुपयांची एफआरपी अदा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 15 मे पर्यंत 36 हजार 380 कोटी 13 लाख रुपयांची एफआरपी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अदा केली आहे.

69 साखर कारखान्यांना 100 टक्के एफआरपी अदा केलेली असून 120 कारखान्याची काही प्रमाणत एफआरपी देणे बाकी आहे. किमान एफआरपीच्या रक्कमेच्या तुलनेत हे प्रमाण 96 टक्के इतके आहे. शेतकर्‍यांना ऊस बिले अदा करण्यात राज्याने देशात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या साखर आयुक्तालयाने केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाला 2021-22 या हंगामाबाबत सादर केलेल्या ऊस थकबाकी अहवालानुसार 15 मे पर्यंत एकूण देय एफआरपी 37 हजार 894 कोटी रुपये आहे.

यात 100 टक्के एफआरपी अदा करणारे 69 कारखाने, 80 ते 99.99 टक्के एफआरपी अदा करणारे 95 कारखाने, 60 ते 79.99 टक्के एफआरपी अदा करणारे 29 कारखाने, शून्य ते 59.99 टक्के एफआरपी अदा करणारे 6 कारखाने आहेत.

यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील 199 साखर कारखान्यानी हंगाम घेतला. 5 मे 2022 अखेर राज्यात 1272 लाख 43 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले होते. त्याची एकूण एफआरपीची रक्कम 37 हजार 894 कोटी 2 लाख रुपये होते. त्यापैकी 36 हजार 380 कोटी 13 कोटी 13 लाख रुपये एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात आलेली आहे. एफआरपी अदा करण्याचे हे प्रमाण 96 टक्के आहे. राज्यात साखर आयुक्तांनी चालू हंगामात कोणत्याही कारखान्याविरोधात वसुली नोटीस लागू केलेली नाही.

एफआरपी टक्केवारी कारखाने संख्या

100 टक्के 69

80 ते 99.99 95

60 ते 79.99 29

शून्य ते 59.99 06

15 मेअखेर शंभर टक्के एफआरपी अदा केलेले जिल्ह्यातील कारखाने

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, मुळा, प्रसाद शुगर, कोळपेवाडी, संगमनेर व संजीवनी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com