केंद्र शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा-मधुकरराव नवले

केंद्र शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा-मधुकरराव नवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

कोणत्याही व्यक्ती ची आर्थिक कमाई कतीही मोठी असो. तरी ती व्यक्ती शेतकर्‍यांच्या घामाने पिकविलेल्या शेती उत्पादित अन्नधान्य यावर जगते.

अभिनेत्री कंगना त्याला अपवाद नाही. तरीही शेतकर्‍यांना दहशतवादी संबोधण्याचा अघोरी अपराध तिने केलाय. केंद्र शासनाने देशद्रोहाचा गुन्हा तिचेवर दाखल करावा. तरच शेतकरी सन्मान शासनाने राखला असे होईल, असे मत ज्येष्ठ शेतकरी नेते मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले.

गेल्या अनेक दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. काल तर तिने कहर करत शेतकर्‍यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली.

कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असे चित्र दिसत असतांना यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं ट्विट करून या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने शेतकर्‍यांचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी आपली भावना व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com