लम्पीचा 175 गावांना विळखा; 283 बाधित, 10 मृत्यू वाढले

लम्पीचा 175 गावांना विळखा; 283 बाधित, 10 मृत्यू वाढले

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात शुक्रवारी लम्पी रोगाचे नव्याने 283 जनावरे बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे लम्पी बाधितांचा आकडा आता 1 हजार 941 झाला असून मृत जनावरांची संख्या 64 झाली आहे. काल एका दिवसात जिल्ह्यात लम्पीमुळे 10 जनावरे दगावली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात काल 175 गावात लम्पी बाधित जनावरे सापडली असून यामुळे या गावाच्या पाच किलो मीटरच्या परिघातील 883 गावातील जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या तरी पशूसंवर्धन विभागाकडून 9 लाख 97 हजार 223 जनावरांच्या लसीकरणाचे नियोजन असून यापैकी 6 लाख 48 हजार 421 जनावरांचे लसीकरण झालेले ाहे. दुसरीकडे जमेची बाजू म्हणजे जिल्ह्यात 646 जनावरांनी लम्पीवर मात केलेली आहे. पशूसंवर्धन विभागाकडून युध्द पातळीवर लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com