<p><strong>गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi </strong></p><p>नेवासा तालुक्यातील मुळा नदी काठी वसलेल्या खेडले परमानंद गावातील किल्ला स्वरूप मठाकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे हा मठ अखेरची घटका मोजताना दिसत आहे.</p> .<p>छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सप्रमाण असलेला शिवभारत हा ग्रंथ कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला आहे. इतिहासात त्यांना नेवासकर या नावाने संबोधले जाते खेडले परमानंद तालुका नेवासा या ठिकाणी छत्रपतींनी दिलेली सनद व किल्लास्वरूप मठ असून पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे खूप पडझड झालेली आहे.</p><p>कवींद्र परमानंद म्हणजेच परमानंद स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा भेटीच्या वेळेस सोबत होते असाही उल्लेख इतिहासामध्ये आढळून आलेला दिसतो. निजामशाहीचा अहमदनगर जिल्ह्यात पगडा असल्याकारणाने शिवशाहीतील गुप्तता, हा संदर्भ देऊन हे ठिकाण पुरातत्व खाते व इतिहासापासून वंचित राहिलेले दिसते.</p><p>परमानंद यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्याला खुश होऊन त्यांना मठ व 580 एकर जमीन सनद म्हणून दिलेली होती. तरी पुरातत्व खात्याने याची दखल घेऊन या छत्रपतींचा वारसा लाभलेल्या या मठाचा जिर्णोध्दार करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.</p>