श्रीगोंदा | तालुका प्रतिनिधी | Shrigonda
विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे आज आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
सध्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे कुकडीच्या धरणातील अतिरिक्त पाणी विसापूर तलावात सोडण्यात आले आहे. हा तलाव भरल्यामुळे या तलावाखालील गावांना उन्हाळ्यात फायदा होणार आहे. या तलावाखाली मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे या भागात ऊस हे महत्वाचे पीक येत असून या पाण्याचा या भागातील शेतीला नक्कीच फायदा होणार आहे.
आज आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक दत्तात्रय पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंढरकर, माजी उपसभापती गणपत काकडे, बाबासाहेब सरोदे भाऊसाहेब इथापे, धनंजय शिंदे, जब्बार सय्यद, नितीन नलगे आदी उपस्थित होते.