अहमदनगर|Ahmedagar
गावातील वर्चस्व सहन न झाल्याने हिंमत अभिमन्यू जाधव (वय- 32 रा. वळण, ता. राहुरी) या तरुणाला गोळ्या घालून जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी सात आरोपींना भादंवि कलम 302,120 ब अन्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीस आजन्म कारावासाची व एकूण 1 लाख 19 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
कृष्णा अशोक कोरडे (वय- 26 रा. इंद्रानगर, मालगाव, जि. बीड), सोमनाथ भानुदास मोरे ( वय- 31 रा. शिंगणापुर, ता. नेवासा), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय- 29 रा. जामगाव ता. गंगापूर जि.औरंगाबाद), रामचंद्र उर्फ राजू चिमाजी शेटे (वय- 44, वळणपिंप्री ता.राहुरी), संदिप बहिरूनाथ थोपटे (वय- 29, रा. कृषी विद्यापीठ राहुरी, ता. राहुरी), राहुल बाळासाहेब दारकुंडे (वय- 28 रा.मोरगव्हाण, ता.राहुरी), जावेद करीम शेख (वय- 36, रा. देवगाव, ता.नेवासा) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत.