17 हजारांच्या शेळ्या चोरीला; वाळुंज येथील घटना

17 हजारांच्या शेळ्या चोरीला; वाळुंज येथील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यात गेल्या काही दिवसांत गायी, बैल आणि शेळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. असा प्रकार तालुक्यातील वाळुंज गावात घडला आहे. या ठिकाणी अविनाश शिंदे यांच्या मालकीच्या 17 हजार रुपये किंमतीच्या तीन शेळ्यांवर चोरांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील वाळुंज येथील शिंदे यांच्या घरा शेजारी त्यांचा शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यातून 14 ऑगस्ट रात्री 11 ते 15 ऑगस्टला सकाळपर्यंत चोरांनी त्यांच्या तीन शेळ्या चोरून नेल्या. या शेळ्यांची शिंगे ही काळी असून या प्रकारी शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरीचा तपास करत असून शेळ्या चोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com