<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) -</strong></p><p><strong> </strong>नगरच्या व्हीआरडीईचे स्थलांतर होणार नाही. काही प्रकल्पांच्या एकत्रिकरणाचा प्रस्ताव होता, मात्र त्याचा निर्णयही स्थानिकांशी चर्चा करूनच </p>.<p>घेतला जाईल अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी खासदार दिलीप गांधी यांच्याशी सोमवारी रात्री मोबाईलवर संपर्क साधत ही माहिती कळविल्याचे गांधी यांनी सांगितले.</p><p>नगरमधून व्हीआरडीई स्थलांतरीत होऊ नये यासाठी दिलीप गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, डिफेन्स कमिटीचे सदस्य खा. शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याचे ते म्हणाले. </p><p>सोमवारी रात्री राजनाथ सिंह यांनी फोन करून व्हीआरडीई स्थलांतरीत करणार नाही, असे आश्वासन दिले, अशी माहिती गांधी यांनी दिली.</p><p>गांधी म्हणाले, व्हीआरडीई स्थलांतरीत करण्याचा संरक्षण खात्याचा प्रस्ताव होता. ही माहिती स्थानिक अधिकार्यांना होती. त्यामुळे त्यांनी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. खा. सुजय विखे यांनीही पाठपुरावा केला. मी वैयक्तिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, डिफेन्स कमिटीचे सदस्य शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठपुरावा केला. </p><p>सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राजनाथ सिंह यांनी याबाबत माझ्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना नगरला व्हीआरडीई राहणे किती महत्वाचे आहे, याची माहिती दिली. त्यामुळे सिंह यांनी व्हीआरडीई स्थलांतरीत होणार नसल्याचे सांगितले. </p><p>....................</p><p><strong>होय, एकत्रिकरणाचा प्रस्ताव होता</strong></p><p> <em>देशातील काही प्रकल्पाचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव होता. पण आता तोही स्थानिक पातळीवर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सिंह यांनी स्पष्ट केल्याचे गांधी यांनी सांगितले.</em></p>