अहमदनगर | प्रतिनिधी
कॉग्रेसचे नाना पटोले आणि खा. संजय राऊत हे बोलघेवडे आहेत. पत्रकारांना काम करता यावे, म्हणून ते आरोप करत असतात...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. राम शिंदे यामध्ये दोघाच्या मी आता बसलेलो असून दोघांमध्ये समन्वय आहे. दोघामध्ये वाद होते वादळ नाही, दोघांमधील वाद क्षमले असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शुक्रवारी नगरमध्ये आयोजित बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकार पैसे देत असेल तरी या योजनेचे सर्व टेंडर महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. तसेच योजनेबाबत तक्रारी आल्यास त्याची चौकशी करू. शासन आपल्या दारी योजनेत येत्या दीड महिन्यात दीड लाख योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देतांना राज्य सरकारचा विस्तार का नाही होणार असा प्रती प्रश्न फडणवीस यांनी पत्रकारांना विचारला.