<p><strong>राहाता (तालुका प्रतिनिधी) -</strong> </p><p>अंगणवाडी कर्मचार्यांना सेवा समाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा असून त्यातून कर्मचार्यांचा उदरनिर्वाह होणे </p>.<p>शक्य नाही. त्यामुळे एकरकमी लाभाबरोबरच दरमहा पेन्शन मिळावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने राहाता पंचायत समितीवर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.</p><p>यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले, अंगणवाडी कर्मचार्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव कृती समितीने सादर केलेला आहे. सदर प्रस्तावानुसार शासनाने तातडीने पेन्शन योजना लागू करून कर्मचार्यांना मिळणार्या वेतनाची निम्मी रक्कम ही दरमहा पेन्शन म्हणून देण्याची मागणी संघटनेने केली आहे. परंतु शासन करत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व सदर मागणी तातडीने सोडवण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहेत. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचार्यांना न्याय द्यावा अन्यथा मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.</p><p>यावेळी युनियनचे सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, वंदना गमे यांची भाषणे झाली. सुरेखा पाळंदे यांनी आभार मानले. मागण्याचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी श्रीमती नागरे यांचेमार्फत मुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्री यांना देण्यात आले.</p><p>यावेळी ज्योती बोराडे, मनिषा जाधव, सुरेखा पाळदे, नासीमा शेख, ज्योती डहाळे, नंदा दिघे, सुनीता कवडे, वैशाली नाईक, वंदना गमे, प्रतिभा निकाळे, सरला राहणे, मंदा वाबळे, शकिला हकीम, संगीता वाघ, रंजना साळुंके, पुष्पलता धनवटे, मंदा दातीर, सुनीता आहेर, आशाबी शेख, कुसुम फाजगे, मीरा सावलके, शीला पिलगर, अर्चना कचवे आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.</p>