करोनाशी लढा देत असताना जनतेने बेसावधपणा टाळायला हवा, असा सल्ला श्रीरामपूर येथील संजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिलीप शिरसाट यांनी दिला आहे.
करोनामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र आपण बेसावध राहिल्याने दुसरी लाट उसळली आहे. त्याचे घातक परिणाम समोर येत आहेत. हे टाळायचे असेल तर प्रतिबंध पाळणे, हा उत्तम उपाय आहे. डॉक्टर बाधितांवर शर्थीचे उपचार करत आहेत. मात्र व्यवस्थेच्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळे नागरिकांनी करोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. ‘सार्वमत कट्टा’ या कार्यक्रमात त्यांच्याशी झालेला संपूर्ण व्हिडिओ संवाद...