लोणी (वार्ताहर)-
माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टिकास्त्र सोडले. काँग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहीजे. परंतू भ्रष्टाचाराच्या विळख्यात ते अडकले आहेत.
मंत्री राहीलो तर संरक्षण मिळेल आणि सत्तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील अशी भिती त्यांना सतावत असल्यानेच ते होणे शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची कोणालाही चिंता नसल्याचा टोला आ.विखे यांनी लगावला.
अपयश झाकण्यासाठी आरोप
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपाचा इन्कार करुन, आ.विखे पाटील म्हणाले की, केवळ आपले अपयश झाकण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरण उघड होतील अशी भिती असल्यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केली.