राज्यात मदिरालये उघडली, पण मंदिराचे दार अजूनही बंद आहेत. मंदिरं बंद..उघडले बार... उध्दवा, धुंद तुझे सरकार अशी कोटी करत नगर शहर भाजपने मंदिरं उघडे करण्यासाठी आज गांधी मैदानात लाक्षणिक उपोषण केले.
राज्याचे आघाडी सरकार हे खरे तर बिघाडी सरकार आहे. एकही चांगला निर्णय सरकार घेत नाही. मंदिराची दारे बंद करुन मदिरेची दारे उघडून सरकारने सिद्ध केले आहे. कोरोनामुळे बंद झालेली मंदिरे अद्याप बंद आहेत. त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले असंख्य पुजारी, पुरोहित, फुलवाले, प्रसादवाले व इतर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच भिक्षेकरींचीही आज दैयनिय अवस्था झालेली आहे. राज्य सरकारला मात्र अद्याप जाग आलेली नाही, म्हणून भाजप आंदोलन व लाक्षणिक उपोषण करत आहेत. यापुढेही जर सरकारला जाग आली नाही तर भाजप याहून अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे यांनी दिला.
शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने व आध्यात्मिक आघाडीच्यावतीने राज्य सरकारने राज्यातील मंदिरे अद्याप उघडली नसल्याच्या निषेधार्थ गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराजवळ लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले. यावेळी महेंद्र गंधे बोलत होते. उपमहापौर मालन ढोणे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, आध्यात्मिक आघाडी प्रमुख प्रद्युन्य जोशी, मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार अध्यक्ष वसंत राठोड, केडगांव अध्यक्ष पंकज जहागिरदार, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, महिला बाल कल्याण समिती सभापती लता शेळके, नगरसेविका पल्लवी जाधव, रविंद्र बारस्कर, संगीता खरमाळे, अनिल सबलोक, राजू मंगलारम, उपेंद्र खिस्ती, भरत सुरतवाला, महेश नामदे, शिवाजी दहिंडे, वैभव जोशी, तुषार पोटे, विलास नंदी, श्रीगोपाल जोशी, सचिन पारखी, अभिजित चिप्पा, संध्या पावसे, प्रिया जानवे, राजु मंगलारप्, गोकूळ काळे, अनिल गट्टाणी, विलास नंदी आदिंसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. राधाकृष्ण महिला भजनी मंडळाचे भजन झाले.