
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील भिस्तबाग चौकात (Bhistbagh Chowk) घरगुती वादातून (Dispute) दोन कुटुंबात हाणामारी (Two Family Fight) झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लक्ष्मी सुनील पवार (वय 20, रा. मुलन माथा ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीचा पती सुनील पवार, सासू हौसाबाई पवार, नणंद अंजली राजेश धोत्रे, अनिल धोत्रे, सुनील पवार याचे मामा आणि मामी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. अंजली राजेश धोत्रे (रा. पंचवटी कॉलनी, भिस्तबाग चौक, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मी पवार, लिलाबाई किसन जंगम, बेबी शिंदे आणि दोन अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.
लक्ष्मी पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, घरगुती वादामुळे मी माहेरी राहत आहे. गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान आईसह सासरी मुलीचे व माझे दवाखान्याची कागदपत्रे आणण्यासाठी गेले असता शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अंजली धोत्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान लक्ष्मी, हौसाबाई आणि बेबी शिंदे यांनी लग्नात दिलेले सामान परत द्या, असे म्हणत शिवीगाळ करून घरातील सामानाची उचकापाचक करून सामान फेकून दिले. लाथाबुक्क्यांनी आणि पाईपने मारहाण केली.