भिंगार पाणीप्रश्नावर कलेक्टरांसोबत बैठक

आ. संग्राम जगताप यांचा पुढाकार : कापूरवाडी तलावातूनच पुरवठ्याचा विचार
भिंगार पाणीप्रश्नावर कलेक्टरांसोबत बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सध्या एमआयडीसी पाणी योजनेतून भिंगार शहरासह मिलीटरीच्या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र, प्रचलित पाणीपुरवठा व्यवस्था ही 40 वर्षांची जुनी असल्याने वारंवार नादुरुस्त होत असून पाणीपुरवठा नेहमीच विस्कळीत होत आहे. 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने भिंगार शहरवासियांची गैरसोय होत आहे.

या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी बैठकीचे आयोजन करून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यात नगर महानगरपालिकेच्या अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मनपाचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.

कापूरवाडी तलावाच्या विहिरीतून भिंगार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बुर्‍हाणनगर चाळीस गाव पाणी योजनेतून पाणी पुरवठा उपलब्ध होण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस छावणी परिषदेचे सीईओ विद्याधर पवार, अभियंता एस.एस. सोनवणे, मुसा सय्यद, संभाजी भिंगारदिवे, अजय भिंगारदिवे, नाथा राऊत, कलीम शेख, सुरेश मेहतानी, संजय सपकाळ, मतीन शेख आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com