जिल्हयात सध्या २८८१ रुग्णावर उपचार सुरू !

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२७ टक्के
जिल्हयात सध्या २८८१ रुग्णावर उपचार सुरू !

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८८१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०१, अकोले ०१, जामखेड ०५ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत २२६ रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com