<p><strong>आंबी |वार्ताहर| Amabi</strong></p><p>राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी पोपट लक्ष्मण खपके यांचा अंमळनेर शिवारात असलेल्या </p>.<p>गट नंबर 96/1/2 मध्ये एक एकर ऊस जळून खाक झाला. खपके यांच्या ऊसाच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊस जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.</p><p>भर दुपारी धुराचे प्रचंड लोट दिसू लागल्याने परीसरातील लोकांनी जळणार्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शेतकरी खपके यांनी तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. याकामी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास सहकार्य केले.</p><p>त्यामुळे आग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली. करोना बरोबरच नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट या अस्मानी संकटांबरोबरच हे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी पोपट खपके हताश झाला आहे. महावितरणच्या देवळाली प्रवरा विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचांसमक्ष पंचनामा केला.</p><p>महावितरणकडून परिसरातील वीजवाहक तारा व खांबांची योग्य देखभाल व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे खपके यांचे मोठे नुकसान झाले असून शासन स्तरावरून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी पोपट खपके, दवणगावचे सरपंच मेजर भाऊसाहेब खपके, उपसरपंच संदीप जर्हाड, पोलीस पाटील नंदकिशोर खपके, ग्रामपंचायत सदस्य जॉन भोसले, संजय होन, गोकुळ साळुंके आदी शेतकर्यांनी केली आहे.</p>.<div><blockquote>दुष्काळात पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाले आहे. यामुळे खपके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती समोर असताना या ओढवलेल्या संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्याला नुकसान भरपाई मिळावी.</blockquote><span class="attribution">- मेजर भाऊसाहेब खपके (सरपंच, दवणगाव)</span></div>