<p><strong>अकोले | प्रतिनिधी</strong></p><p>अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत.अनेक ठिकाणी प्रस्थापितां विरुद्ध तरुणांनी कडवी झुंज दिल्याचे चित्र दिसत आहे.</p>.<p>वीरगाव येथे भाजपचे जि.प. मधील गटनेते जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचौरे व अगस्ति कारखान्याचे संचालक रामनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रा पं वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून येथे महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.</p><p>भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले गिरजाजी जाधव यांच्या हातून आंबड गावची सत्ता खेचण्यात सत्ताधारी महाविकास आघाडीला यश आले. तर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांनी आपल्या कळस गावची सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे. विजयानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी पत्रकारांना मतमोजणी स्थळी सोडन्यास नकार दिल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.</p>.<p>कोतुळ येथे जि प चे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख व अगस्ति कारखान्याचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला 13 तर विरोधी जि प सदस्य रमेशराव देशमुख यांच्या पॅनलला अवघ्या 4 जागांवर यश मिळविता आले.</p>