<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) - </strong></p><p>राज्यातील शिधापत्रिकाधारकांचा आढावा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अपात्र शिधापत्रिकांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश </p>.<p>देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.</p><p>त्यानुसार नगर जिल्ह्यासह राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व शिधापत्रिकांची तपासणी 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत केली जाणार आहे. या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने दिले आहेत.</p><p>राज्यातील बनावट/बोगस/अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता राज्यात सन 2008, 2010 व 2011 मध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविण्यात आली होती.</p><p>सर्व शहरातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करावी. यासाठी नमुना फांर्म वाटप केले जातील.रेशनकार्ड धारकांकडून माहिती भरून दिलेले फॉर्म स्विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच द्यावी. छाननी केल्यानंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावी. तर गट ब मध्ये पुरावा न देणारांची यादी करावी. गट अ मधील शिधापत्रिका पूर्ववत सुरू राहतील. गट ब मधील यादीतील शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अशा शिधापत्रिकेवर शिधावस्तू देण्याचे त्वरीत थांबविण्यात येणार आहे.</p>