नगर शहरातील उड्डाणपुलावर अपघात

वकीलाचा मृत्यू
अपघात
अपघात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीला (Bike) वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात (Accident) येथील अ‍ॅड. अनिरुद्ध रामचंद्र टाक (वय 46) यांचा मृत्यू (Death) झाला. उड्डाणपुलावरील (Flyover) वळणावर शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. अ‍ॅड. टाक आपल्या दुचाकीवर उड्डाणपुलावरून जात असताना एका वाहनाची (Bike) त्यांच्या दुचाकीला धडक (Accident) बसली.

अपघात
'या' कारणासाठी मनपा आयुक्तांची सोमवारी बैठक

अपघाताची (Accident) माहिती उड्डाणपुलावरून (Flyover) प्रवास करणार्‍यांनी पोलिसांना दिली. अ‍ॅड. टाक यांच्या खिशातील व्हिजीटींग कार्डवरून त्यांची ओळख पटली. ते दुचाकीवरून एकटेच प्रवास करीत होते. दुचाकीला (Bike) जेवणाचे पार्सल लावलेले होते. त्यांच्या मोबाईलमधील नंबर शोधून पोलिसांनी अ‍ॅड. टाक यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला.

अपघात
आचारसंहितेचे कारणपुढे करत खा. विखे यांची चुप्पी

अ‍ॅड. टाक यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असून ते एकटेच घरी होते. त्यामुळे अन्य नातेवाईक तेथे आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अ‍ॅड. टाक येथील कामगार न्यायालयात वकिली करत होते. हा पूल झाल्यापासून त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. कालच्या अपघातामुळे पुलाची रचना आणि वाहतूक नियोजनातील त्रुटी यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

अपघात
या कारणावरून पती-पत्नीच्या डोक्यात कवचा मारला
अपघात
सहा महिन्यांत 22 गुरूजींचे निलंबन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com