अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात गुरूवारी 823 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 लाख 8 हजार 264 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.53 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही. कालही नव्याने शंभरहून अधिक बाधित समोर आले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 57, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 294 आणि अँटीजेन चाचणीत 351 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 4, जामखेड 1, कर्जत 2, नगर ग्रामीण 1, पारनेर 34, पाथर्डी 12, संगमनेर 1, श्रीगोंदा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 19, अकोले 19, जामखेड 4, कर्जत 10, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 35, नेवासा 21, पारनेर 5, पाथर्डी 14, राहाता 35, राहुरी 7, संगमनेर 51, शेवगाव 28, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 16 आणि इतर जिल्हा 8 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत काल 351 जण बाधित आढळुन आले. मनपा 11, अकोले 45, जामखेड 7, कर्जत 42, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 12, नेवासा 35, पारनेर 45, पाथर्डी 11, राहाता 13, राहुरी 26, संगमनेर 63, शेवगाव 5, श्रीगोंदा 24, श्रीरामपुर 5 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.