करोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू; नव्या 45 रुग्णांची भर

करोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू; नव्या 45 रुग्णांची भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात मंगळवारी 106 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 70 हजार 357 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.15 टक्के इतके झाले आहे. मंगळवारी रूग्ण संख्येत 45 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 963 इतकी झाली आहे. दरम्यान मंगळवारी करोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. करोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 1102 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना लॅबमध्ये 3, खाजगी तपासणीत 28 आणि अँटीजेन चाचणीत 14 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पाथर्डी 2 आणि संगमनेर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 9, राहाता 2, राहुरी 1 आणि शेवगाव 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 14 जण बाधित आढळुन आले. मनपा 4, नगर ग्रामीण 3, नेवासा 1, पारनेर 2, पाथर्डी 1 आणि राहुरी 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com