करोना : 16 मृत्यूंसह 405 बाधित वाढले

4 हजार 197 सक्रीय रूग्णांवर उपचार
करोना : 16 मृत्यूंसह 405 बाधित वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सोमवारी जिल्ह्यात नव्याने 405 करोना बाधित रूग्णसमोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 37 हजार 259 झाला असून

उपचार सुरू असणार्यांची संख्या 4 हजार 197 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 614 करोना बळी गेले असून यात सोमवारच्या 16 मृतांचा समावेश आहे.

दरम्यान, करोनावर मात केलेल्यांची संख्या आता 32 हजार 448 इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 87.09 टक्के आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 93, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 40 आणि अँटीजेन चाचणीत 272 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमधील बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 40, राहाता 1, नगर ग्रामीण 11, नेवासा 2, श्रीगोंदा 3, पारनेर 3, राहुरी 1, शेवगाव 14, कोपरगाव 6, जामखेड 9, कर्जत 1, आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 40 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 13, संगमनेर 7, राहाता 2, नगर ग्रामीण 4, श्रीरामपुर 2, श्रीगोंदा 1, पारनेर 3, अकोले 3, राहुरी 1, कोपरगाव 2 आणि कर्जत 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 272 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 36, राहाता 40, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 2, श्रीरामपूर 1, कँटोन्मेंट 5, नेवासा 12, श्रीगोंदा 15, पारनेर 17, अकोले 18, राहुरी 13, शेवगाव 20, कोपरगाव 28, जामखेड 24 आणि कर्जत 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- बरे झालेली रुग्ण संख्या 32 हजार 448

- मृत्यू 614

- एकूण बाधित रूग्ण 37 हजार 259

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com