<p><strong>अहमदनगर l प्रतिनिधी</strong></p><p>जिल्हा बँक निवडणुकीवर निर्णयासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीतही</p>.<p>अंतिम निर्णय झाला नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे 'चर्चा सुरू आहे' या पातळीवरच निर्णयाचे घोडे अडल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीला जिल्ह्यातील तीन मंत्र्यापैकी ना. बाळासाहेब थोरात व ना.प्राजक्त तनपुरे हे दोघे उपस्थित होते. पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.</p><p>दरम्यान, बँकेसाठी विक्रमी अर्ज दाखल असून ११ फेब्रुवारीपर्यंत माघारीसाठी वेळ आहे. यामुळे बँकेच्या निवडणुकीचे फासे कसे पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.</p>