पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या दुरूस्तींसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून शटडाऊन घेण्यात येणार आहे. शनिवारी हा शटडाऊन असून यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत राहणार आहे.

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसराला शनिवारी, दिनांक 20 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व उपनगरातील गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर हडको, लॉईड बिशप कॉलनी या भागाला रविवार ऐवजी सोमवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा होईल.

तसेच सर्जेपुरा भाग, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी परिसर, दिल्ली दरवाजा, नालेगाव परिसर , चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, आनंदी बाजार, कापड बाजार परिसर, माळीवाडा भाग, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी उपनगर भागाला सोमवार ऐवजी मंगळवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही अहमदनगर महापालिकेने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com